Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 4 उत्तमलक्षण Additional Important Questions and Answers

कविता : उत्तमलक्षण  ( संतकाव्य ) संत रामदास

1.‘जनीं आर्जव तोडूं नये पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।

आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी प्रस्तुत ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.

काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात- लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.


2.‘अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची।।’ 

आशयसौंदर्य : संत रामदासांनी ‘उत्तमलक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे.

काव्यसौंदर्य : संत रामदास म्हणतात लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांना समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोधी शब्दांमुळे ओवीची खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचार चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसावर तत्त्व ठसवण्याची समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे.


3.सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथे जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।

आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या ‘श्रीदासबोधातील’ उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा खुलासा त्यात केला आहे.

काव्यसौंदर्य : सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, असत्याच्या वाटेवर कधीही जाऊ नये व खोटेपणाचा अभिमानही कधी बाळगू नये, असा संदेश प्रस्तुत काव्यपंक्तीतून मिळतो. सर्वज्ञपणा अंगी बाणवण्यासाठी या आदर्श गुणांची आवश्यकता असल्याचे संतकवी रामदास पटवून देतात. हे संतकाव्य वाचल्यावर शांतरसाचा अनुभव मिळतो.

भाषिक वैशिष्ट्ये : साडेतीन चरणांच्या या ओवीतील, पहिल्या तीन चरणांत ‘नये’ या शब्दाची पुनरावृत्ती होऊन अंत्ययमक साधले गेले आहे, त्यामुळे काव्याला नादमयता प्राप्त झाली आहे. तसेच, यात विरुद्ध अर्थांच्या शब्दांची योजना करून काव्यसौंदर्य साधले गेले आहे. उदाहरणार्थ, सत्यमार्ग सांडूं नये असत्य पंथे जाऊं नये।। ‘सत्यमार्ग’ यासारख्या सामासिक शब्दाची योजना करून एकाच नेमक्या शब्दात अचूक अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सांडू, पंथें, जाऊं अशी अनुस्वार असलेली शब्दांची जुनी भाषिक रूपे यात आढळतात. तत्कालीन मराठी संतकाव्यातील भाषेचे आशय व भावसौंदर्य यांत पाहायला मिळते. शांतरसाचा अनुभव देणारी ही रचना वैशिष्ट्यपूर्ण वाटते


कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कृती सोडवा.

     कविता – उत्तमलक्षण 

 प्रस्तुत कवितेचे कवी /कवयित्री : संत रामदास.

कवितेचा रचनाप्रकार : ओवी.

कवितेचा काव्यसंग्रह : श्रीदासबोध.

कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.

कवितेतून व्यक्त होणारा ( स्थायी )भाव : आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास

कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात आल्यावर मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने ही कविता आपली स्वतःची स्वतः साठी असलेली वाटते.

कवितेतून मिळणारा संदेश : प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला समाज समर्थ समाज निर्माण होतो. हाच संदेश या कवितेतून मिळतो.


खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा.

            ‘जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।

              पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।‘

 उत्तर :

आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तीमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी वरील ओवीमध्ये तीन लक्षणांची चर्चा केली आहे.

काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती अमान्य करू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून चांगल्या मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्पुयमार्गाने जाण्याचे सोडू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.


 ‘सभेमध्ये लाजों नये । बाष्फळपणे बोलों नये ।’,या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर:

‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण वरील चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये. बाष्कळपणे बोलू नये.

उत्तम पुरूषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.


आळसे सुखसु मानूं नये’, या ओळीचा तुम्तुहांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर:

‘उत्तमलक्षण’ या ओव्यांंमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे.

‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो !’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटखुंते, भविष्य अंधारते. ते आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सूख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.



‘जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।

पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’ (मार्च ‘१९)

उत्तर :

आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.


काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात – लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर . करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.


भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.


‘अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।

विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।।’ (मार्च ‘१९)

उत्तर :

आशयसौंदर्य : संत रामदासांनी ‘उत्तमलक्षण’ या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे.


काव्यसौंदर्य : संत रामदास म्हणतात – लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.


भाषिक वैशिष्ट्ये : सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांना समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोधी शब्दांमुळे ओवीची खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचार चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसावर तत्त्व ठसवण्याची समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे.



‘आळसें सुख मानूं नये,’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.


‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो!’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.


 उत्तमलक्षण.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी : संत रामदास.

(२) कवितेचा रचनाप्रकार : ओवी.

(३) कवितेचा काव्यसंग्रह : श्रीदासबोध.

(४) कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.

(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव : आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास.


(६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये : प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचीक रचनाप्रकार आहे. त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. साहजिक कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दांत कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते.


(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना : प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. समाजात वावरताना कसे वागावे, काय करावे व काय टाळावे यांचे सुस्पष्ट शब्दांत निवेदन केले आहे. समाज नीतिमान व कर्तबगार व्हावा, ही तळमळ या पदयपाठातून स्पष्टपणे जाणवते.


(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार : प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी, व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. नेहमीच सावध मनाने वागावे. इतरांना सहकार्य करावे. कोणाशीही कपटाने वागू नये. तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे. आळस झटकून टाकावा. पूर्ण विचार करून वागावे. उपकाराची परतफेड करावी. नेहमी उदारपणाने वागावे. मनाचा मोठेपणा बाळगावा. परावलंबी होऊ नये. नेहमी सत्याने वागावे. कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे.


(९) कवितेतील आवडलेलो ओळ :

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।।

विवेके दृढ धरावी । वाट सत्याची ।।


(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली, स्वतःची, स्वतःसाठी असलेली वाटत राहते.


(११) कवितेतून मिलणाग संदेश : प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो.


‘सभेमध्ये लाजों नये। बाष्कळपणे बोलों नये।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे.


मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे


उत्तमलक्षण Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात – श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. ।।१।।

पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये. फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. ।।२।।

लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. तिला अमान्य करू नये. पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करून पैसा मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. ।।३।।

जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ।।४।।

काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये.) ।।५।।

सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये, कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये. कुणाशीही स्पर्धा करू नये. ।।६।।

कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी, उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ।।७।।

स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये. कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ।।८।।

सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे, असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ।।९।।

अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।


उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ स्पष्टीकरण

श्रोतिं व्हावे सावधान I आता सांगतो उत्तम गुण I

 जेणे करिता बाने I खुण सर्वज्ञपणाची II1 II

संत रामदास म्हणतात, श्रोत्यांनो म्हणजेच माझे हे विचार ऐकणाऱ्या लोकांनो ! आज मी तुम्हाला उत्तम माणूस किंवा गुणवान माणूस कोणाला म्हणायचे ? या विषयी माहिती सांगणार आहे . अशा उत्तम माणसाचे गुण सांगणार आहे. ही माहिती सांगत असताना गुणवान किंवा उत्तम ज्याला म्हणायचे त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आणि जर ते गुण त्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती गुणवान आहे. असे म्हणता येईल.गुणवान व्यक्तिची संत रामदास यांनी सांगितलेली ही लक्षणे ऐकून नक्कीच यातून तुम्हाला काहीतरी चांगले ज्ञान मिळेल. अशी आशा संत रामदास या पहिल्या ओवीतून व्यक्त करतात.



 वाट  पुसल्याविण  जाऊ नये I फळ ओळखल्याविण  खाऊ नये I

 पडली वस्तू घेऊ नये I येकायेकी II 2 II

 उत्तम माणसाची लक्षणे सांगत असताना किंवा उत्तमलक्षण भावार्थ पाहत असताना संत रामदास, उत्तम माणसाचे पहिले लक्षण सांगतात की अशी व्यक्ती की तिच्च्यविषयी पहिला गुण सांगतात उत्तम माणसाने कुठेही जात असताना आपण ज्या रस्त्याने किंवा मार्गावरती जात आहोत तो मार्ग कुठे जात आहे ? त्या मार्गामध्ये काही संभाव्य अडचणी तर नाहीत ना ? याची चौकशी करणे गरजेचे आहे. आपल्या हातामध्ये जर एखादे अनोळखी फळ म्हणजे या आधी आपण ते कधी खाले नाही का तर ते ओळखीचे नाही. फळ खण्या अगोदर त्या फळाची माहिती जाणून घ्यावी.


 संत रामदास या दुसऱ्या ओवीत म्हणतात,

ज्यांनी आर्जव  तोडू नये  पाप द्रव्य जोडू नये I

पुण्य मार्ग सोडू नये कादाकाळी II3 II

आपल्याला जर कोणी आर्जव म्हणजे विनंती केली किंवा मदत मागितली तर त्या विनंतीचा मान राखावा. त्या  विनंतीची अवहेलना होणार नाही.याची दक्षता घ्यावी.आपल्यावरती जीवन जगत असताना कितीही वाईट प्रसंग आले तरी पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने पैसा कमवू नये. पैसा हा नेहमी विधायक मार्गाने आणि घाम गाळूनच मिळालेला असावा.असे संत रामदास सांगतात.आपण जर एकादा चांगला मार्ग पकडला असेल.म्हणजेच पुण्याचा मार्ग पकडला असेल म्हणजेच सदमार्ग पकडला असेल .तर तो सदमार्ग कदापी सोडू नये म्हणजे कधी सोडू नये.खरोखर उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ आजही आपल्याला उपयोगी पडणारा आहे. 

तोंडाळासी  भांडो नये I वाचाळाशी  तंडो नये I

संतसंग  खंडू नये Iअंतर्यामी II४ II

 संत रामदास उत्तम माणसाचे गुण सांगत असताना एका गुणा विषयी ते म्हणतात, जी व्यक्ती तोंडाळ म्हणजे भांडखोर असते ती सतत कोणाशी ना कोणाशी भांडत असते.अशा व्यक्तीच्या नादाला कदापि लागू नये. आणि त्याच बरोबर हे नुसती बडबड करणारे वाचाळ वीर असतात अशा वाचाळ बडबड्या लोकांशी देखील वाद करत बसू नये. कारण असे केल्याने त्यांच्याबरोबर आपली देखील किंमत कमी होत असते. खरोखर उत्तमलक्षण कवितेचे स्पष्टीकरण खूप जीवणोपयोगी आहे.


 आळसे सुख मानू नये I चाहाडी मनास आणू नये I 

 शोधल्यावीणकरू नये I कार्य काही II५ II 

 आळसामध्ये कधीही सुख मानू नये.आळस हा माणसाचा नेहमी घातच करत असतो,त्यामुळे त्या आळसामध्ये जरी आनंद वाटत असला तरी तो आनंद हा विघातक आहे. म्हणूनच आळसात सुख मानू नका.असा सल्ला संत रामदास देतात. काही लोकांना चुगली करणे म्हणजे चहाडी करणे एखाद्या च्या पाठीमागे बोलणे ही घाणेरडी सवय असते ही सवय तात्काळ सोडावी. आणि कायम संतसंघ किंवा संतांची संगत म्हणजे चांगल्या लोकांची संगत कधीच सोडू नये. 


 सभेमध्ये लाजू नयेI बाष्कळपणे बोलू नये I

पैज होड  घालू नये I काही केल्या II६ II

संत रामदास उत्तमलक्षण कवितेत उत्तम माणसाची लक्षणे  सांगताना एका ओवीत म्हणतात,जर एखाद्या सभेमध्ये तुम्ही उपस्थित असाल तर त्या वेळी आपले विचार मांडायला हवेत. कारण त्यांच्या मते सभा हे बोलण्याचे ठिकाण आहे. हेच उत्तम माणसाचे लक्षण आहे. काही लोक सभेमध्ये म्हणजे ज्याठिकाणी बोलण्याची संधी आहे. अशा ठिकाणी बोलत नाहीत आणि नको त्या ठिकाणी बाष्कळ पणे म्हणजेच गैरलागू बोलत असतात. अशा लोकांना संत रामदास उत्तम माणसाची लक्षणे सांगताना कानपिचक्या देताना दिसतात. अनेक व्यक्तींना पैजा लावण्याची किंवा शर्यती लावण्याची सवय असते.संत रामदास म्हणतात काही झाली तरी कोणाशी पैज किंवा होड लावू नये.कारण का तर ही पैज एखाद्याच्या जीवावर तीदेखील बेतू शकते.


 कोणाचा उपकार घेऊ नयेI घेतला तरी राखो नये I

 परपीडा करू नयेI विश्वास घातII७ II

 जीवन जगत असताना कधीकधी आपल्याला कोणाची ना कोणाची मदत ही घ्यावीच लागते. ही घेतलेली मदत म्हणजे एक प्रकारचा उपकारच असतो.आपण जर कधी कुणाचा उपकार घेतला तर त्या व्यक्तीने आपल्यावरती केलेले उपकार विसरू नका.त्या उपकारांची परतफेड करा. त्यांनी आपल्याला मदत केली असेल तर आपण देखील त्यांना मदत करा. परपीडा म्हणजे कधीही जीवनामध्ये दुसऱ्याला त्रास देऊ नका.सर्वात महत्वाचे म्हणजे कधी कोणाचा विश्वास तोडू नका.म्हणजेच विश्वासघात करू नका खरोखरच संत रामदासांचे त्याकाळचे विचार आजच्या काळात देखील तंतोतंत लागू होतात.

 व्यापक पण सांडू नये I पराधेरन होऊ नये I

आपलेवो वोझे घालू नये I कोणी एकासी II८II

  उत्तम माणसाची लक्षणे सांगताना संत रामदास सांगतात, व्यापकपण म्हणजेच आपल्या मनाकडे असलेला मोठेपणा होय. तो कधीच कमी होऊ द्यायचा नाही. तो मनाचा मोठेपणा कायम वाढायलाच हवा. जीवन जगत असताना स्वावलंबी बना कधीही पराधेन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आपण दुसऱ्याचा भार बनेल असे राहू नका. थोडक्यात काय तर जीवनात यशस्वी व्हा.असे संत रामदास यांना म्हणायचे आहे. 


 सत्यमार्ग सांडू नये Iअसत्य पंथे जाऊ नयेI

 कदा अभिमान घेऊ नये I असत्याचा II९ II

संत रामदास म्हणतात, सत्याचा मार्ग म्हणजे जीवन जगत असताना सापडलेला सुयोग्य मार्ग. काहीही झाले तरी देखील आपला सत्याचा मार्ग सोडू नये.आपण जगत असताना खोटेपणाचा आधार घेत असू तर त्या खोटेपणाचा राग यायला हवा. पण अनेकांना तो खोटेपणा स्वाभिमानाची बाब वाटते. अशा लोकांना संत रामदास म्हणतात, असत्याचा म्हणजेच खोटेपणाचा कधीही अभिमान करू नका. कारण खोटेपणा हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. 

अपकीर्ती ते सांडावी I सकीर्ती वाढवावी I

 विवेके दृढ धरावी I वाट सत्याची II १० II

काही लोक समाजामध्ये वागत असताना त्यांचे चुकीचे वागणे पाहून लोक त्यांच्यावर टीका करत असतात. एक प्रकारे समाजामध्ये त्यांची अपकीर्ती झालेली असते. परंतु त्या अपकीर्तीला देखील काही लोक गौरवाची बाब मानत असतात.परंतु ही उत्तम माणसाचे लक्षण नाही. तर माणसाने नेहमी आपली सत्किर्ती वाढेल.असेच वागायला हवे आणि कायम विवेकाची म्हणजेच सारासार विचार यांची कास धरून चांगला मार्ग स्वीकारावा.


 अशाप्रकारे संत रामदास उत्तमलक्षण या कवितेच्या माध्यमातून जर तुम्हाला कुणी गुणी किंवा चांगला माणूस व्हायचं असेल तर वर सांगितलेले सगळे गुण तुमच्या मध्ये येण्यासाठी सदैव दक्ष रहा. संत रामदासांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितलेले विचार उत्तम लक्षण कवितेचा भावार्थ उत्तम लक्षण कवितेचे स्पष्टीकरण पाहिल्यानंतर आपल्या असे जाणवते की खरोखरच आजच्या या कलियुगामध्ये ही कविता किंवा उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ जसाच्या तसा लागू होतो. उत्तमलक्षण कविता इतकी आशय संपन्न आहे की उत्तमलक्षण कवितेचे स्पष्टीकरण पाहिल्यानंतर दृष्टिकोनात बदल करावा व उत्तम गुण येण्यासाठी धडपड करावी असे वाटत राहते. आपण त्या कवितेकडे पाहून त्या दृष्टिकोनातून उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ केवळ वाच्यार्थ न राहता अजून बरेच काही सुचवू पाहत आहे. Uttamlakshan Spashtikaran Bhavarth Sar आपल्याला आवडले असेल याची खात्री आहे.पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद ! 


कवितेचा भावार्थ 

श्रीदासबोध या ग्रंथातून घेतलेल्या रचनेत समर्थ रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे.व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये, हे सांगताना त्याने सत्याच्या मार्गावर चालावे, विवेकपूर्ण वागावे व स्वतःचे कल्याण करावे असा संदेश दिला आहे.

 उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात –

श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. || १ ।।

पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. || २ ।।

लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये ।।३।।

जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ॥४ ॥

काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. ते कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्या बद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही ते काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये ) ।।५ ॥

सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये ॥ ६॥

कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुः ख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ॥७ ॥

स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्युयाचे ओझे लादू नये. ॥८।।

सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान,व्यर्थ गर्व करू नये.॥९।।

कधीही अपकीर्ती होऊ देऊ नये, सत्कीर्ती वाढवावी, विवेकाने नेहमी ठामपणे सत्याचीच वाट धरावी. ॥१०।।


 संत रामदास (१६०८ ते १६८२) :

संतकवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानकाव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. ‘दासबोध’ ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. ‘मनाचे श्लोक’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे.

संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्ती ची लक्षणे सांगि तली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश

या रचनेतून संत रामदास देतात.


श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।

जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।


वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।

पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।


जनींआर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।

पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।


तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।

संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।


आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।

शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।


सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।

पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।


कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।

परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।


व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।

आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।


सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।

कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।


अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।

विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।


उत्तमलक्षण शब्दार्थ


उत्तम – आदर्श, गुणसंपन्न,

लक्षण – गुणवैशिष्ट्य.

श्रोतीं – ऐकणाऱ्या लोकांनो.

सावधान – सावध होणे, सजग होणे.

उत्तम – उत्कृष्ट, जेणें – ज्याने.

बाणे – बाणणे, अंगिकारणे, सवय लागणे,

सर्वज्ञ – सारे जाणणारा.

पुसल्याविण – विचारल्याशिवाय,

येकायेकी – एकदम, पटकन.

जनीं – लोकांचे. आर्जव – विनंती.

पापद्रव्य – पापाने (कपटाने) मिळवलेली संपत्ती.

जोडू नये – साठवू नये.

पुण्यमार्ग – चांगला रस्ता, सद्वर्तन,

कदाकाळी – कोणत्याही वेळी.

तोंडाळ – वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ.

वाचाळ – व्यर्थ बडबड करणारा.

तंडो नये – तंटा (भांडण) करू नये.

संतसंग – सज्जन माणसाची संगत.

खंडू नये – तोडू नये.

अंतर्यामी – मनातून, हृदयातून.

आळस – काम न करणे.

चाहाडी – एखादयाबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा.

कार्य – काम,

सभा – समूहाची बैठक.

बाष्कळपणा – बालिशपणा.

पैज – स्पर्धा, शर्यत.

होड – पैज,

परपीडा – दुसऱ्याला छळणे, दुःख देणे.

विश्वासघात – बेइमानी.

व्यापकपण – (मनाचा) मोठेपणा.

पराधेन – परावलंबी, दुसऱ्यावर विसंबणे.

वोझें – (स्वत:चा) भार,

कोणीयेकासी – कोणावरही.

सत्यमार्ग – खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन.

असत्य – खोटेपणा.

पंथे – मार्गाने, वाटेने.

कदा – कधीही.

अभिमान – व्यर्थ गवं.

अपकीर्ति – बेअब्रू, वाईट प्रसिद्धी,

सत्कीर्ति – चांगली प्रसिद्धी.

वाडवावी – वाढवावी.

विवेके – चांगल्या विचाराने.

दृढ – ठाम, मजबूत, ठोस.


Related Searches:

  • उत्तम लक्षण या कवितेतून संत रामदासांनी कोणता संदेश दिला?
  • उत्तमलक्षण स्पष्टीकरण भावार्थ सार| Uttamlakshan Spashtikaran Bhavarth Sar
  • Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 4 उत्तमलक्षण Textbook Questions and Answers
  • Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 उत्तमलक्षण
  • Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)
  • Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 4 उत्तमलक्षण Textbook Questions and Answers
  • ( इयत्ता दहावी : मराठी कुमारभारती ) कवितेच्या ओळींचे रसग्रहण
  • कवितेच्या ओळींचे रसग्रहण
  • Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 4 उत्तमलक्षण Additional Important Questions and Answers


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post