वृत्तलेख इयत्ता 12 वी मराठी स्वाध्याय | वृत्तलेख स्वाध्याय - RuttaLekh swadhyay

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi

वृत्तलेख इयत्ता 12 वी मराठी स्वाध्याय | वृत्तलेख स्वाध्याय - RuttaLekh swadhyay

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi

कृती | Q 1 | Page 110
वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
SOLUTION
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, 'बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.' म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमी आस्वादनीय रूप असते.

कृती | Q 2 | Page 110
बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.
SOLUTION
'जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे' या उक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमी विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत 'मी' असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखाद्या घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते.वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमी न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.

कृती | Q 3 | Page 110
वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
SOLUTION
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख
(२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख
(३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख
(४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख
(५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखाद्या क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते. या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्ती संबंध झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.

कृती | Q 4 | Page 110
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
SOLUTION
वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो. वृत्तलेखात शैली ह्या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.

थोडक्यात उत्तरे लिहा :

कृती | Q 5.1 | Page 110
1) वृत्तलेखाची गरज.
SOLUTION
बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील बातमीविषयीची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना समजून घ्यायची असेल, तर बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करीत असते. वृत्तलेखातून बातम्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होते. घडून गेलेल्या वाघडू पुण्याच्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. बातमी आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची मदत होत असते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानही वृत्तलेख वाचनातून होत असते.

2) वृत्तलेखाचे स्रोत.
SOLUTION
प्रसारमाध्यमांवर प्रकाशित, प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज तयार होत असते. बातमीच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडित अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. यातून वृत्तलेखाला बीज सहज मिळू शकते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय निर्माण करता येऊ शकतो.

3) वृत्तलेखाची भाषा
SOLUTION
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमी पेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.

4) वृत्तलेखाची वैशिष्ट्य.
SOLUTION
अनेकदा एखादया बातम्या वाचनानंतर वाचकाच्या मनात त्या बातमी विषयी कुतूहल निर्माण होते. बातम्या स्वरूपानुसार घटनेमागील घटना बातमीत सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकांच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीशी असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल बोलत असते. बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला 'धावपळीत साहित्य' असेही म्हणतात. वाचकांना बातमी आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते.

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi

कृती | Q 6 | Page 110
1) वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा
SOLUTION
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने 'मुक्ता' या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवत यांचे वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे. १९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता बद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या विद्येच्या वाटेवर' या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे. सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील 'मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार' संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवत यांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलग दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi

कृती | Q 7 | Page 110
2) बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
वृत्तलेखाची प्रकृती बातमी वर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठ पुणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखाद्या घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दुवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल. घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्द्यांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

कृती | Q 7 | Page 110
3) बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
वृत्तलेखाची प्रकृती बातमी वर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठ पुणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखाद्या घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दुवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल. घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्द्यांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi

प्रास्ताविक
आपले जीवन बातम्यांनी व्यापले आहे. आपण आकाशवाणीवरील बातम्या ऐकतो, दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहतो आणि ऐकतो. वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील जिज्ञासा संपत  नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. बातमी ज्या प्रसंगावर आधारित असते, त्या पलीकडील वाचकांची जिज्ञासा  शमवण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रास करावा लागतो. वर्तमानपत्राचा उद्देश माहिती देणे, लोकजागृती करणे, लोकशिक्षण  करणे, मनोरंजन करणे हा आहे. बातमीत जे घडले, ते जसे आहे तसेच द्यावे लागते. बातमीत ‘मी’ असत नाही, तर  घडलेली घटना ‘जशी आहे’ ‘तशी देणे’ ही बातमीची गरज असते; परंतु बातमीत न आलेली रंजक, नावीन्यपूर्ण माहिती आणि तिचे सूक्ष्म धागेदोरे व वेगवेगळे तपशील हे वाचकांना वृत्तलेखात वाचावयास मिळतात.

± अर्थ आणि स्वरूप 
अनेकदा बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे गरजेचे असते. मात्र बातमीत तो देता येत नाही.  त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जातो. त्याला इंग्रजीत ‘फिचर’ असे म्हणतात. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात  त्याचा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. त्याचा भावार्थ ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही’ असा होतो. वर्तमानपत्राचा जन्म पाश्चात्त्य देशात झाल्याने  तेथील काही संकल्पना भारतीय वृत्तपत्रातदेखील रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. आता  वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची आणि वाचकांची गरज बनली आहे. बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्यासंबंधीचा तपशील, गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. 

ती गरज पूर्ण करण्यासाठी वृत्तलेख लिहिला जातो. फिचर म्हणजे ‘नॉन न्यूज’ असे म्हटले जात असले तरी वृत्तलेखाचा संबंध  नेहमीच बातमीशी असतो. वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो. त्याला काही निमित्त असावे लागते. वृत्तलेख  हा घडलेल्या, घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात.  वृत्तलेख तातडीचा असला तरी त्यामधील अचूकतेला महत्त्व असते. हे लेखन वास्तवावर आधारित असल्याने त्यात  कल्पकतेला फारसा वाव नसतो. खरेतर बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेख मदत करतात. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांची दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे यांतून वाचकांचे समाधानही महत्त्वाचे ठरते. वृत्तलेख स्वतंत्र असतो. त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. तसेच तो आकर्षकही असतो. वृत्तलेखाची  भाषादेखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते.

 वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी, त्यांना आपलीशी  वाटणारी, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी, कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी असते. सातत्यपूर्ण लेखनसरावानंतर  ती कमवता येते. वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा, माहिती देणारा, ज्ञान देणारा, मनोरंजन करणारा असतो. वाचकाला  त्यात रस असतो, हे लेखन त्याची उत्सुकता वाढवणारे असते. वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली, वाचकांच्या विचाराला चालना देणारी असते. वाचकांच्या विचाराला धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. मांडणी अत्यंत  मुद्देसूद असते. आपल्या लेखातील मुद्‌द्यांच्या समर्थनार्थ माहितीशी संबंधित आलेख, नकाशा, छायाचित्र,  व्यंगचित्र, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य परिणाम साधला जातो. वृत्तलेख लिहिताना  लिहिणारा स्वतःचा अनुभव आणि त्या विषयांच्या संदर्भाने असलेली तज्ज्ञता वापरत असतो.

± वृत्तलेखांचे प्रकार
विषय आणि लेखन प्रकारानुसार वृत्तलेखाचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 
(अ) बातमीवर आधारित वृत्तलेख- एखाद्या घटनेच्या, बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे, त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो. मात्र जी बातमी वर्तमानपत्रात  छापून आलेली असते, तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते. तर त्या बातमीतील महत्त्वाच्या मुद्‌द्यांवर  अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्‌द्यांचे विश्लेषण केले जाते.  लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी, स्वतंत्र माहिती असते. अनेकदा वृत्तलेख लिहिताना  तज्ज्ञांशी बोलून, घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद  असतो. वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक,  शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो.  
उदा., पर्यावरण, दिल्लीतील वाढते प्रदूषण- कारणे आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम,  दळणवळणावरील गुंतवणूक, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा  परिणाम. 

(आ) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख – अशा प्रकारच्या लेखात जसे असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीवर लिहिले  जाते तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य असलेल्या सामान्य माणसाबद्दलदेखील लिहिले जाऊ शकते.  एखाद्या क्षेत्रात मिळवलेले देदीप्यमान यश, केलेला संघर्षव प्रयत्नांची पराकाष्ठा, एखाद्या समस्येवर मात  करताना केलेला उपक्रम, कृती, केलेला विक्रम या संदर्भात वृत्तलेख लिहिले जातात. औचित्य साधून या  प्रकारचे लेख लिहिले जातात. अनेकदा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार, गौरव, वाढदिवस, अमृतमहोत्सव,  जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाताे. या प्रकारातील  वृत्तलेख लिहिताना त्या व्यक्तीसंबंधी झालेले पूर्वीचे लेखन, चरित्र, आत्मचरित्र, त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्ती, सहकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन देखील या प्रकारचे वृत्तलेख उत्तम स्वरूपात तयार करता येतात.  वाचकांच्या पुढे केवळ जीवनपट मांडणे अपेक्षित नसते. आकडेवारी, सनावळ्या, परिचय एवढ्यापुरते ते  लेखन मर्यादित नसते. त्यामध्ये त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, दृष्टिकोन, खास शैली, सवयी, वैशिष्ट्ये असा व्यक्तिगत स्पर्श असतो. भावनिक स्पर्श हे अशा प्रकारच्या लेखाचे वैशिष्ट्य असते. 
उदा., पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ. श्रीराम लागू इत्यादी.

(इ) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख- विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असतात.  प्रसारमाध्यमांसाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखतीचा भाग लेख स्वरूपात वृत्तपत्रात  प्रकाशित केला जातो. या लेखातून व्यक्तीच्या कर्तृत्वाची बाजू, संशोधन, मतप्रणाली, त्यांचा दृष्टिकोन,  त्यांनी निवडलेले क्षेत्र, एखादा अविस्मरणीय प्रवास, स्वतःच्या क्षेत्रात मिळवलेले अभूतपूर्व यश, अनुभव या  संदर्भाने त्यात मांडणी केली जाते. सर्वसाधारण लोकांना जे माहीत आहे त्यापेक्षा वेगळे काही मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या लेखात केला जातो. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची स्वतःची म्हणून जी काही भूमिका असते ती या  प्रकारच्या वृत्तलेखातून मांडली जाते. त्यातून त्या माणसाच्या कर्तृत्वाची उंची व संबंधित क्षेत्रातील योगदान  अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो.
उदा., गिर्यारोहक, संशोधक, नामवंत लेखक, कवी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्या मुलाखतींवर आधारित लेख इत्यादी.

(ई) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख- गावे, स्थळे, वास्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात. काही ठिकाणी  संशोधन करताना उत्खनन होत असते. संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट आदी  संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असते. अनेकदा संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक  अभ्यासातून एखाद्या वास्तूकिंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. त्या नव्या माहितीच्या संदर्भात  प्राचीन माहितीचा उपयोग करून लेख लिहिता येतो. ग्रामीण पंरपरेतील लोकसाहित्याच्या संदर्भांचा अभ्यास  करून मांडणी करता येते. लिहिणारी व्यक्ती त्या स्थळाला भेट देते. त्याने जे पाहिले, अनुभवले त्या बाबतीत  तो वृत्तलेख लिहिला जातो. एखाद्या इतिहास तज्ज्ञाशी झालेली चर्चा, त्यांचे व्याख्यान आणि त्यातून  मिळालेल्या नव्या माहितीचा उपयोग करून ऐतिहासिक वृत्तलेख लिहिला जातो. अशा स्वरूपाच्या वृत्तलेखाची गरज म्हणून नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा देखील वापर करता येतो.
उदा., अहमदनगर शहर, भुईकोट किल्ला, शनिवार वाडा, हेमाडपंथीय मंदिरांचे शिल्पकाम इत्यादी.

(उ) नवल, गूढ, विस्मय इत्यादींवर आधारित वृत्तलेख- एखादी विस्मयकारक घटना, कृती, निसर्गातील नवलाई  यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित हा लेख असतो. एखाद्या परिसरातील निसर्गाचे दृश्य हा जसा वृत्तलेखाचा  विषय ठरतो त्याप्रमाणे एखादे गूढ, निसर्गातील एखादा चमत्कार हा देखील वृत्तलेखाचा विषय ठरतो. मात्र  यासंबंधी लेखन करतांना आपण ज्यावर लिहीत आहोत त्या संबंधीची शहानिशा करणे, त्या संदर्भातील माहिती  पारखून घेणे, चिकित्सा करणे आवश्यक ठरते. यामधील माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची असते. 
उदा., सांगलीत नदीच्या महापूराच्या पाण्याची पातळी ५८ फूट, हिमालयातील निसर्ग, रांजणखळगे, मोठा  अपघात होऊनही एखाद्या बालकाचा प्राण वाचणे, डोक्यावरून पाणी वाहून जगवली वीस हजार झाडे..  इत्यादी स्वरूपाच्या घटना वृत्तलेखाचे विषय होतात.   वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लोकरुचीचे विषय, खाद्यसंस्कृती इत्यादी  विषयांवरही वृत्तलेख लिहिले जातात.

± वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात?

 वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला भेटणाऱ्या व्यक्ती, प्रवास, अनुभव, निरीक्षण, विविध वर्तमानपत्रांतील  बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळे, दूरचित्रवाणी या सारखी विविध साधने ही आपल्याला वृत्तलेख  लिहिण्यासाठीचे विषय मिळवून देत असतात.  वृत्तलेखासाठीच्या विषयांचे स्रोत पुढील गोष्टींतून मिळू शकतात. 

(१) बातमी- वर्तमानपत्रात प्रकाशित होणारी बातमी, नियतकालिकात लिहिले गेलेले विशेष वृत्त/वृत्तमाला  वाचल्यानंतर; तसेच दूरचित्रवाणीवर दाखविलेली घटना पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने मनात वृत्तलेखासंबंधी विचारांचे  बीज तयार होत असते. त्या बातमीच्या मागे असलेल्या गोष्टी, संदर्भ, मुलाखत घेऊन त्या बातमीच्या संबंधाने उत्तम  वृत्तलेखाची निर्मिती करता येते. बातमीकडे विविध अंगांनी पाहिले आणि त्या घटनेचा परिणाम समजून घेण्याचा  प्रयत्न केला तर आपल्याला वृत्तलेखासाठी अनेक विषय सहज मिळू शकतात.
उदा., “विजेशिवाय वाहनांच्या ट्यूबचे पंक्चर काढणे” अशी बातमी प्रकाशित झाल्यावर पंक्चर नेमके कसे 
काढले जाते? असे का करावे वाटले? त्यामागील प्रेरणा कोणती? त्यामुळे काय परिणाम साधला जाणार आहे?  लोकांची सोय, विजेची बचत, त्यातून मिळालेला रोजगार अशा अंगाने हा वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो.


(२) व्यक्तिगत अनुभव- पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला अनेक घटना/प्रसंगांना सामोरे जावे  लागते.बातमी मिळवताना अनेक अनुभव मिळत जातात. त्यातील काही अनुभव बातमीला मदत करतात. तर काही  केवळ अनुभवाची शिदोरी वाढविण्यास मदत करतात; पण ते अनुभव वाया जात नाहीत. गतकाळातील असे अनुभव भविष्यातील एखाद्या वृत्तलेखासाठी मदत करणारे ठरतात. ‘बसस्थानकावरील फेरीवाल्यांच्या संघटनेची स्थापना’ अशी बातमी जेव्हा येते, तेव्हा त्यावर वृत्तलेख  लिहितांना फेरीवाल्यांची संख्या, त्यांच्या व्यवसायातील कष्ट, वेळ, त्यांच्या कुटुंबांचे उदरभरण, रोजगाराचे उत्पन्न  अशा मुद्‌द्यांवर वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. यात केवळ तपशीलाची नोंद अपेक्षित नसते तर त्यामधून त्यांच्या जीवनानुभवाचे दर्शन घडणे आवश्यक असते. 

(३) भेटीगाठी/संभाषण- पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला उत्तम लिहिता येण्यासाठी त्याचे भाषाज्ञान उत्तम  हवे. तसेच व्यवसायाची गरज म्हणून उत्तम संवाद कौशल्य हवे असते. त्याला अनेक क्षेत्रात जाऊन बातमी मिळवावी  लागते. त्यामुळे अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधावा लागतो, तर कधी शेतकरी, शेतमजूर, कलाकार,  खेळाडू, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, लोकप्रतिनिधी यांच्याशी बोलताना अनेक मुद्‌द्यांना स्पर्श करावा लागतो.  कधी कधी काही माणसे बोलत नाहीत तेव्हा त्यांना बोलते करण्याचे कौशल्य पत्रकारांकडे असावे लागते. त्यांच्याशी  बोलताना अनेक विषय सहजतेने मिळून जातात.  या संभाषणातून एखाद्या व्यक्तीचे अनेक पैलू सहजतेने समोर येतात.विदर्भातील जमीन विकून भाताच्या जातीचे  संशोधन करणारे दादाजी खोब्रागडे यांची शोधकथा वृत्तलेखासाठी विषय देऊन जाते. एखादा अधिकारी अशी घटना  सहजपणे चर्चेत सांगून जातो. अशा व्यक्तींना, कुटुंबातील सदस्य, सहकारी यांना प्रत्यक्ष भेटून आणखी काही पैलू  समोर येतात. 

(४) निरीक्षण- पत्रकाराने चौकस असायला हवे. पत्रकाराला बातमीचे धागेदोरे मिळवावे लागतात.  वृत्तलेखासाठी सूक्ष्म दृष्टी असावी लागते. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. त्या घटनांचे  बारकाईने निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधता येणे व वृत्तलेखाचे विषय निवडता येणे महत्त्वाचे असते.  वृत्तलेखासाठी निरीक्षणातून आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर  आणल्या जातात.  अंत्यविधीच्या ठिकाणी ‘प्रेत जाळण्याचे काम करणारी महिला’ ही बातमी आहे; पण त्या बातमीची अधिक  माहिती घेतली तर आपल्याला वृत्तलेखाचा विषय मिळू शकतो. ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणंसाचा वापर’, ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘बांधकामाचे साहित्य वरती नेण्यासाठी टाकाऊ मोटारसायकलाचा वापर’  अशा कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती आपण पाहात असतो. त्यामधून वृत्तलेखाचे विषय मिळतात. मात्र  त्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते.

± वृत्तलेख लिहितांना विचारात घ्यायच्या बाबी

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्‌धिक भूक कशी भागवली जाईल याचा  विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. कारण वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्राची विक्री आणि जाहिराती मिळणे अवलंबून असते. या दोन्ही गोष्टी अर्थव्यवहाराशी निगडित असतात. त्या दृष्टीने वृत्तलेखासाठी  देखील वाचकांची गरज आणि विषयाची निवड यांचा विचार करावा लागतो.

(अ) वाचकांची अभिरूची- आपले वाचक, त्यांची गरज, अभिरूची लक्षात घेऊन वर्तमानपत्रात लेखन  करावे लागते. एखादे वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होते. त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे,  त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरूची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकते. त्यामुळे वृत्तलेख  लिहिताना वाचकांच्या अभिरूचीचा विचार करावा लागतो.

(आ) तात्कालिकता- वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हा  विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात.  त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

(इ) वेगळेपण- वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते.  वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज असते.

(ई) वाचकांचे लक्ष वेधणे- वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता  टिकली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो. त्यात  साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील  चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे या सर्वांचा विचार करावा लागतो. सदर चित्रे कोठे उपलब्ध होणार आहेत, कोणाकडून काढून घ्यायची आहेत हा विचार देखील करावा लागतो. वृत्तलेखाचा  मजकूर जितका उत्तम हवा असतो तितकीच त्याची चित्रे देखील समर्पक व चांगली असावी लागतात.  कारण एक चित्र हजार शब्दांचे काम करते असे म्हणतात. त्या अर्थाने वृत्तलेखाची उंची वाढवण्याचे  काम समर्पक चित्रे करत असतात. या संबंधीचे नियोजन केले आणि त्यासाठीचे कच्चेटिपण, संदर्भ तयार करून ठेवले, तर वृत्तलेख लिहिणे सुलभ होते.

(उ) वृत्तलेखाची शैली- वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात  बातमीचा उलगडा झाला पाहिजे. ‘कशावरती’ आणि ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात  समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार  करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी  लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये.  प्रदीर्घवाक्ये नसावीत. छोटी छोटी वाक्ये असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी  आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहीत आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली  जात आहे ना, हे लक्षात घ्यायला हवे.

± समारोप
 आधुनिक तंत्रज्ञानामुळे वर्तमानपत्राचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्याचबरोबर सध्याच्या अत्यंत वेगवान  बनलेल्या ‘ब्रेकिंग न्यूज ’च्या जमान्यात माध्यमांमुळे लोकांना घटना तात्काळ कळण्याचा वेग प्रचंड वाढला आहे.  त्यामुळे अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी हव्या असतात.  अशा स्वरूपाची लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. वृत्तलेखांसाठी  विशिष्ट रक्कमेचे मानधनदेखील दिले जाते. त्यामुळे बातमीच्या पलीकडचे आणि वाचकांची भूक शमवणारे लेखन  करण्याची क्षमता मिळवली तर वर्तमानपत्रांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी निश्चित मिळू शकते.

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post