उत्तम लक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी । Uttam lakshan swadhyay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

उत्तम लक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी । Uttam lakshan marathi 10th class swadhyay iyatta dahavi

विद्यार्थी मित्रांनो अशा या नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत उत्तम लक्षण इयत्ता दहावी चा स्वाध्याय आणि तसेच  हा धडा देखील बघणार आहोत परंतु आधी आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि त्यानंतर आपण धडा बघणार आहोत तरी आपण आधी सर्व स्वाध्याय लिहून किंवा वाचून घ्यावा आणि त्यानंतर संपूर्ण धडा वाचा भाजपने करून आपल्याला या पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील समजतील आणि पाठ वाजल्यानंतर या पाठा मध्ये काय आहे हे देखील समजेल चला तर पाहूया उत्तम लक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी आणि जाणून घेऊया या धड्याचे प्रश्न उत्तर


आकृत्या पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 4
1) संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
SOLUTION
(१) अपकीर्ती सांडावी.
(२) सत्कीर्ती वाढवावी.
(३) सत्याची वाट दृढ धरावी.

2) कधीही करू नयेत अशा गोष्टी
SOLUTION
(१) पुण्यमार्ग सोडू नये.
(२) पैज किंवा होड लावू नये.
(३) कुणावरही आपले ओझे लादू नये.
(४) असत्याचा अभिमान बाळगू नये.

3) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
SOLUTION
गुण
(१) मी नियमित सूर्यनमस्कार घालतो.
(२) मी नेहमी सत्य बोलतो.
(३) थोरामोठ्यांचा सन्मान करतो.
दोष
(१) मला लवकर आळस येतो.
(२) माझे अक्षर चांगले नाही.
(३) मला पटकन राग येतो.

खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

कृती | Q (२) (अ) | Page 10
1) तोंडाळ
SOLUTION
तोंडाळ - तोंडाळासी भांडू नये.

2) संत
SOLUTION
संत - संतसंग खंडू नये.

खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.

कृती | Q (३) | Page 10
गोष्टीदक्षता
(१) आळस______
(२) परपीडा______
(३) सत्यमार्ग______
SOLUTION
गोष्टी

दक्षता

(१) आळस

(१) आळसात सुख मानू नये

(२) परपीडा

(२) परपीडा करू नये.

(३) सत्यमार्ग

(३) सत्यमार्ग सोडू नये.


खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा | 

कृती | Q (४) (अ) | Page 10
1) ‘जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। 
 पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।’
SOLUTION
आशयसौंदर्य : 'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.
काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात-लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. 'तोडू नये, जोडू नये, सोडू नये' अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 


काव्यसौंदर्य

कृती | Q (४) (अ) | Page 10
1) सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
SOLUTION
'उत्तमलक्षण' या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.

2) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
'उत्तम लक्षण' या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.

'आळस' हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. 'आळसे कार्यभाग नासतो!' या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात 'आळस' हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती:

१. समास :

1) पुढील तक्ता पूर्ण करा : (ठळक अक्षरांत उत्तरे दिली आहेत.)

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 21

२. अलंकार :

पुढील ओळी वाचून तक्ता पूर्ण करा :
1) ‘ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी।।’

2) ‘नयनकमल’ हे उघडित हलके जागी हो जानकी.
SOLUTION
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 23

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)

३. वृत्त :

पुढील ओळींचे लगक्रम लिहा :
1) ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
SOLUTION
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 24

2) मना सज्जना भक्तिपंथेचि जावे.
SOLUTION

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 25


उत्तमलक्षण शब्दार्थ

  1. उत्तम – आदर्श, गुणसंपन्न,
  2. लक्षण – गुणवैशिष्ट्य.
  3. श्रोतीं – ऐकणाऱ्या लोकांनो.
  4. सावधान – सावध होणे, सजग होणे.
  5. उत्तम – उत्कृष्ट, जेणें – ज्याने.
  6. बाणे – बाणणे, अंगिकारणे, सवय लागणे,
  7. सर्वज्ञ – सारे जाणणारा.
  8. पुसल्याविण – विचारल्याशिवाय,
  9. येकायेकी – एकदम, पटकन.
  10. जनीं – लोकांचे. आर्जव – विनंती.
  11. पापद्रव्य – पापाने (कपटाने) मिळवलेली संपत्ती.
  12. जोडू नये – साठवू नये.
  13. पुण्यमार्ग – चांगला रस्ता, सद्वर्तन,
  14. कदाकाळी – कोणत्याही वेळी.
  15. तोंडाळ – वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ.
  16. वाचाळ – व्यर्थ बडबड करणारा.
  17. तंडो नये – तंटा (भांडण) करू नये.
  18. संतसंग – सज्जन माणसाची संगत.
  19. खंडू नये – तोडू नये.
  20. अंतर्यामी – मनातून, हृदयातून.
  21. आळस – काम न करणे.
  22. चाहाडी – एखादयाबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा.
  23. कार्य – काम,
  24. सभा – समूहाची बैठक.
  25. बाष्कळपणा – बालिशपणा.
  26. पैज – स्पर्धा, शर्यत.
  27. होड – पैज,
  28. परपीडा – दुसऱ्याला छळणे, दुःख देणे.
  29. विश्वासघात – बेइमानी.
  30. व्यापकपण – (मनाचा) मोठेपणा.
  31. पराधेन – परावलंबी, दुसऱ्यावर विसंबणे.
  32. वोझें – (स्वत:चा) भार,
  33. कोणीयेकासी – कोणावरही.
  34. सत्यमार्ग – खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन.
  35. असत्य – खोटेपणा.
  36. पंथे – मार्गाने, वाटेने.
  37. कदा – कधीही.
  38. अभिमान – व्यर्थ गवं.
  39. अपकीर्ति – बेअब्रू, वाईट प्रसिद्धी,
  40. सत्कीर्ति – चांगली प्रसिद्धी.
  41. वाडवावी – वाढवावी.
  42. विवेके – चांगल्या विचाराने.
  43. दृढ – ठाम, मजबूत, ठोस.

उत्तमलक्षण Summary in Marathi

उत्तमलक्षण Summary in Marathi
कवितेचा भावार्थ :
उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात – श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. ।।१।।

पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये. फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. ।।२।।

लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. तिला अमान्य करू नये. पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करून पैसा मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. ।।३।।

जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ।।४।।

काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये.) ।।५।।

सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये, कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये. कुणाशीही स्पर्धा करू नये. ।।६।।

कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी, उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ।।७।।

स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये. कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ।।८।।

सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे, असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ।।९।।

अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।

उत्तम लक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी । Uttam lakshan marathi 10th class swadhyay iyatta dahavi

संत रामदास (१६०८ ते १६८२) : 
संतकवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक  उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन  करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानकाव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध  प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. ‘दासबोध’ ही त्यांची संपूर्णस्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व  जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. ‘मनाचे श्लोक’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे.  संत रामदास यांनी या रचनेत आदर्शव्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्गस्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश  या रचनेतून संत रामदास देतात.

उत्तम लक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी 

श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । 
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये । 
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । 
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये । 
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । 
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये । 
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये । 
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । 
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । 
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।। 
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । 
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।

उत्तम लक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी । Uttam lakshan marathi 10th class swadhyay iyatta dahavi

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post